सो आज ब्लॉग वरचा  पहिला दिवस आहे, म्हणजे  खूप दिवस झाले परत ब्लॉग वर काही पोस्ट करू लागलोय, आणि आपण तो वाचत  आहात हे पाहून बर  वाटलं. हे सर्व लिहणं  हे  माझ्यासाठी  खरंच आनंददायी अनुभव आहे  कारण यामुळे मी माझ्याशी कनेक्ट होतोय. हे लिखाण यात सर्व आहे. मनातली घालमेल ,डोक्यात असलेल्या  कल्पना  आणि  गोष्टींचे ,खेळ  आहेत . बस जस मनात येईल तस या व्यासपीठावर उमटवत जायचं एवढाच हा खटाटोप  आहे  .बरं  हा लेखन प्रपंच तरी कशासाठी तर स्वतःला आजमावण्यासाठी. बरेच दिवस मनात येत होत कि लिहल पाहिजे लिहल पहिजे. लिहण  हि माझी आवड आहे काय माहित एक दिवशी ती माझी निवड हि असू शकेल.
आयुष्य खूप धावपळीचं बनत चाललं आहे लोक हल्ली स्वतःला खूप कमी वेळ देत आहेत,खरी सुखाची कल्पना हे विसरले आहेत. मुंबई मला याच कारणासाठी आवडत नाही करणं हि स्वप्न नागरी भलेही  असेल पण सुख नगरी नक्कीच नाही. मुंबई ला पहाटेच्या लोकल मधेही लोक कानाला हेडफोन लावून टिकटॉक पबजी खेळात गुंतलेली देशाची भाग्यविधाता  पिढी पहिली तर विषन्न  वाटत.बरं  असा करण्यात त्यांना किती समाधान मिळत असावं तर शून्य.,समाधान किती आहे तर क्षणिक .मनाला निरागस आनंद देणार काम तेच जे हल्ली आपण विचार करतो आणि  झोपी जातो.  हे स्वप्न जगायचं कधी हेच विसरून जातो  आणि  विचार केला असेल का हा वेळ स्वतःसाठी वापरावा. हल्ली तरुण  पिढी मोबाइल मध्ये गुंतली आहेत, देवाच्या दरबारात जाऊन दर्शन घेल्याला ५ मिनिटेही झाली नसतील तोपर्यंत नोटिफिकेशन  पाहण्याची घाई झालेली असते. बरं  आपण मंदिरात का जातो हेही नेमके माणसांना उमगत नाही. असो तो वेगळा विषय आहे.हल्ली  सगळ्या गोष्टी कश्या आता कॅजुअलं झाल्या आहेत. 

हे २१ दिवस स्वताला  देणे हा माझ्या मनाचा आंतरकौल आहे म्हणायला हरकत नाही. वेगवेगळे विषय हाताळणे, त्यात झोकून देऊन लिहणे. हि भलेली अवघड वाटणाऱ्या मोहिमेवर सध्या मी आहे बघू कास जुळतंय भेटूयात पुन्हा नव्याने एका नवीन भागासह . LOVE  अँड PEACE ..... 

ऊर्वी



                        सुट्टी संपवुन आता परतीचे वेध लागले. सोलापुर-पुणे पॅसेंजरने भिगवणला उतरलो.घाईघाईने रिक्षा पकडली व मधल्या सिट्वर टेकुन हुश्श केलं. रिक्षा भरायला आणखी थोडा वेळ होता,इतक्यात एक मुलगी व बरोबर दोन मुले घेऊन घाईने येऊन मागे बसली. कपाळावरचा घाम पदराने पुसत ती पदराचा वारा घेत पोरांना डटावतं इकड – तिकडं पाहू लागली. तिच्याकडे लक्ष जावं असं काही विशेष नव्हतं,पणं तिची दोन मुले गोंधळाने लक्षं वेधुन घेत होती.तिच्या शेजारी एक शेतावरची राबणारी म्हातारी येऊन बसली आणि रिक्षा सुरु झाली.

                        पंधरा मिनिटाच्या प्रवासात सुरुवातीला कुणी बोलतं नव्हतं. सर्व जण आप-आपल्या कामात मग्न होते. माझा शेजारी जाडं भिंगाची काचं असलेला चेषमिश आणि डाव्या बाजूस जूनाचं पेपर वाचत बसलेला रेल्वे कर्मचारी. मागे बसलेल्या म्हातारीने तिची चंची खोलली, तिच्यातील तंबाखू मळत-मळत उगाचं विषय काढला.

                        कायं गं पोरी, कुठली म्हणायची….? म्हातारी.

                        उंब्रजची…

म्हातारीनं तिरकसं नजर टाकत तिच्याकडे पाहीलं, आणि तंबाखू दाढेत ठेवतं विचारल..

                        ही चिलीपिली तुझीच हायत व्हंय….? म्हातारी.

                        व्हंय… पोरीनं छोट्या पोराच्या नाकातला शेंबूड पदराने पुसत सांगितलं….

                        नवरा कुठंय….? म्हातारी.

                        मेला…..

                        ऑ……?

                        एवढ्या लवकर…..? काय झालंत त्याला….? म्हातारीने संशयाने बघितलं

                        गाववाल्यांनी मारला…. ती.


                        म्हातारी आणखी काही विचारत होती पण स्टॉप आला. सर्वानी आप –आपले सामानं काढली व आप- आपल्या मार्गाला लागली, म्हातारीनं जपूनं जाण्याचा तिला सल्ला दिला आणि आपल्या मार्गाने ती निघून गेली.मीही बारामतीला जाण्यासाठी स्टॉपवर आलो.ती आपली लहानगी मुलं संभाळत तिच्या स्टॉपकडे निघाली. काही वेळानंतर ती बारामतीच्या स्टॉपकडे आली. मला नवलं वाटल आणि कुतुहलंही…

                        का बरं ती इकडे आली असावी…? इतक्यात जोराचा वारा सुटला आणि पाऊस सुरु झाला.तिची मुलांना संभाळण्याची कसरत सुरु झाली. भिगवण- बारामती बस आली म्हणूनं मी पाऊसात धावतं बस पकडू लागलो. स्टॉपवर वर्दळ नसल्याने चालकाने गाडी न थांबवता तो निघून गेला. त्याला शिव्याची लाखोली वाहतं मी पुन्हा स्टॉपकडे परत आलो.

                        स्टॉपवर ती, शेजारी एक माणूस,स्टॉपच्या भिंतीला खेटूनं पदरानं तोंड गुंडाळलेली बाई सोडलं तर कुणीही नव्हतं मी पुढची बस येईल की नाही या विवंचनेत विचार करत बसलो होतो. पावसाचा जोरं वाढतच होता. आता अंधार दाटू लागला होता.तो शेजारी व ती बाई एक दोन करत – करत निघुन गेले. आता फक्त ती मुलगी, तिची मुलं आणि मी होतो.

                        मी विचारात मग्न होतो, इतक्यात कोणीतरी जवळ येऊन खांद्याला हलवतयं याची जाणीव झाली, मी झिडकारुनं पाहिलं तर तिचा तो मुलगा बोट दाखवत रडू लागला. हो.. तो माझ्या बॅगेमधला डोकावणारा बिस्कीट पुडा पाहत होता. हा पुढा मी काकांच्या छोट्या मुलींसाठी घेतला होता पण बाहेर काढायची आठवणंच झाली नाही. तो तसाचं राहिला. बॅगेची चैन थोडी उघडी होती, त्यातून तो पुढा दिसतं होता. मुलगा हट्ट करु लागला, तसां आईने त्याला धुपाटण्यासारखा धुपाटला. पोरंग आता सूर धरुन रडू लागलं. गप्प बसेना हे पाहून तिनं त्याला पदराखाली घेतलं. आणि आता तिची नजरही त्या पुढ्याकडे जाऊ लागली.मी तिला तो देऊ केला. तिनं तो घेतला नाही. म्हटंल राहू दे. जरा आढ्वेढं घेत तिनं तो पुढा घेतला आणि पिशवीतल्या साडीखाली कोंबला.

                        काही वेळ गेला एस. टी अजून येत नव्हती. ती मुलगीही डुलक्या घेऊ लागली.पाऊसाचं पाणी आता शेडमध्ये येऊ लागलं तशी ती उठली व शेजारी येऊन बसली. मगाच कुतुहलही अजुन तसच होतं.

                        गावाला गेला नाही ….? मी आपलं सहज म्हणूनं विचारलं

                        न्हायं यस्टी आधीच गेलती….

                        मग आता कसं जाणारं गावाला…..?  मी

                        सकाळी सातची डायरेक गाडी हायं …..

      ती रात्रभर त्या स्टॉपवर राहणार होती. तिच्या त्या विषयावर बोलण्याची गरज वाटली नाही.

                        घरी तरी जाऊन करायचय काय…?  ती

                        अगं सासू सासरे, घरातले सगळे वाट पाहत असतील नां…  मी

                        सासू सासरा मळ्यात वायलं राहत्यात. हामी गावात राहतू.

विजेच्या कडकडात तिच्याकडे पाहीलं, वय अंदाजे २० ते २१ वर्ष असावं शिडशिडीत, काहीसा सावळा वर्ण आणि २ मुलांची आई एवढं अपरीपक्व वैशिष्ट्ये तिच्या सोबतीला होती.

                        सासू- सास-याकडे का राहत नाही….? मी

                        हाडूळ हायती दोघं… रागात तिची कानशिलं तापू लागली..

पोरगं परत रडू लागलं. सासू – सास-याचा राग तिन मुलावर काढला, परत तेच नाटक चालू झाल, परत तिने पोराला पाजायला घेतलं. आता तिच्यातली अपरीचिताची भावना गळून पडली. तिच्या मनाला मोकळा करणारा विषय मिळाला होता. मलाही काही प्रश्न विचारायची गरज भासली नाही.

      जात येगळी होती आणि माझ्या बानं हुंडा दिला नव्हतां आणि काय देणारं वो सायेब.. बाप दुस-याच्या शेतावर राबतूं आणी आयं खुरपाया जाती, शिजन आसल तर पैका मिळतो ब-यापैकी, नायतर घरातच बसुन राहयची आय.बाप शेतावर राबायचा. मोकळा वेळ मिळाला तरं करमाळ्याला हमाली करायचा. म्या सातवीत असतानाचं बानं लगीन ठरवलं मुकाट आयकून घ्यावं लागलं.

                        तुमच्याकडं होत्यात का वो इतक्या लवकर लग्न….? स्टोरी सांगता-सांगता तिनं अचानकं सवाल केला. मी गडबडलो.. अचानकं आलेल्या प्रश्नावर कशी प्रतिक्रिया द्यावी.. आम्ही पण गावाकडे राहतं होतो पण गावाला सुधारणांच वारं लागल होतं. माझ्या बॅचची काही अपवाद वगळता सर्वच मुले- मुली किमान दहावी पास होती.

                        मी उत्तर द्यायच्या आत तिची स्टोरी पुन्हा सुरु झाली.

                        “पनं माझं झालं… सास-यानं बां ला दहा हजार हुंडा मागितलां. सास-यानं बैठक मोडली,पण ह्याच्या मनात मी भरली हुते. ह्यानी हेकाच धरला, हिच्याशीच लग्न करणार म्हणूनं. नव-यानं त्या वेळी आठवीतनं शाळा सोडली होती. आणि गावात चकाट्या पिटण्याच काम करायचा. सास-यानं त्याला सरपंचाकरवी गावातल्या शाळतं लावला. पैका हातात खेळू लागला. सास-याच दारुचं यसन पोरानं बरुबर उचललं.. बापाचं आणं नव-याच रोज खटकं उडू लागलं. घसरुन बाप पोरावर वरडायचां,”

                        हिच्या आयला ह्या रांडनच तुला बाटीवलायं…. बायकूच्या हातचं बाहूलं झालायं तू….? कोण कुठली हाडळ… म्हनत सास-यान माझ्या झिंज्या धरुन माराय लागला. नव-यानं त्याला माग वढलं आणं बापाचं थोबाड रंगवलं…. आणं पेकाटात लाथ मारली. आईवर शिवी हासडून घराभाईर काढला. दुस-या दिशी सास-यानं सासूला घेऊन मळा गाठलां. म्या आपलं का उग मंधी पडा म्हणल, गप्प रायले.

                        नव-याची दारु वाढत चालली व्हती. त्या लयं समजाऊन सांगितलं, सुदीत असताना लय ग्वाडं बोलायचा. पण पिऊन आल्यावर सैतानासारखा वागायचां.आंगाची वढं लागल्यावरबी सैतानासारखा वागायचा. मला आपलं रडू यायचं. पण नवरा काय आयकतोय..

                        गावातल्या पंचानी नव-याला दमात घेतला.बायकूला डोक्यावर चढवू नगूसं… नायतर तुझा निर्णय माला करावा लागलं काय न काय.. नव-याला नौकरी व्हती म्हणून काय आढलं नायं.

                        एका दिशी नवरा घाबरतं घाबरतं आला आणं म्हणाला,

                        ऊर्वे,ऊर्वे कुठ जाऊ नगसं… गाववाल्यांचा काय भरवसा नाय. आपल्या जिवाला धोका हाय. घरातलं काय सामानं आसलं तर मला सांगत जा. पोरांना खेळायला नगो सोडू… म्या बै लयं घाबरले… ह्यांच्या कपाळावर घाम बघितला आणि माझ काळीजच फाटलं. ह्याच्या छातीवर डोक टेकवलं तरं ह्यांच काळीज जोरात वाजत हुतं.

                        दुस-या दिशी शेजारची बाईडी वरडंत वरडंत आली.

                        ऊर्वे, ऊर्वे….. तुझ्या नव-याचा जीव घेतला की गं लोक्कांन… म्या आपली पळत पळत चौकाकडं गेले. तं नवरा मरणाच्या दारात हुता, लोकं जमली होती. लोक्कांनी गर्दी केली होती तमाशा बघाया. नव-यान जीव सोडला आणि म्या चक्कर येऊन चौकातच पडले. सुदीवर आल्यावर करमाळ्याच्या हास्पिटलात होते. म्या रडून रडून गळून गेलते. पोस्ट्मार्टेम झाला. त्या लोकांना अटक झाली. म्या आत्ता पक्की रांड झाली साहेब.. सास-यान अजून ढूंकुनबी बघीतलं नायं. नवरा गेला साहेब… कसं जगायचं आता कुणा ठावं. बा पणं ठिवून घेयना.. आले परत… सांगा सायेब मी काय करु….. थोडा वेळ ती रडतं राहीली.. नंतर शून्यात ती बघत राहीली. मला तिचे सांत्वन कसे करावे किंवा काय सल्ला द्यावा हे समझेना.

                        पावसाने आता उघडीप दिली. पत्र्यावरचं पाणी खाली गळतं होतं.सावरतं तिनं पोराला सरळ केलं. शेजारी निजवलं आणि भिंतीला टेकून बसली. मी तिला १०० ची नोट दिली. ती लाजली शरमेनं मान खाली घातली. मी म्हंटल, राहू दे माझ्या बहिणीसारखी आहेस. मुलांना खर्चाला राहू दे.आढवेढं घेत ते पैसे तिने घेतले. काही अंतरावरच्या हॉटेलामधून तिला गरमा- गरम भजी घेऊन दिली. ती लोकं फार भुक्याजली होती. या अल्पोपहारामुळे काही अंशी भुक भागेल याचं समाधान घेऊन मी बसची वाट पहातं होतो. रात्री ८ वाजताची करमाळा- सातारा बस होती. बरोबर ८.०५ ला बस आली. तिला काळजी घे सांगून बसमध्ये बसलो. जाताना तिला पाहिले असता खिन्न भाव तिच्या डोळ्यात आणि चेह-यावर स्पष्ट दिसतं होते.

                        निसर्गाने सर्वाना सारखेच केले आहे. तरी उच्च नीच, गरीब श्रीमंत अशा भावनांनी माणसाला पोखरुन काढले आहे. ऊर्वीच्या ऊर्वरित आयुष्याबद्दल विचार केला तर, वयाच्या २१ व्या वर्षी की जे वयं आता शारीरिक, भौतिक सुखासाठी आसुसलेले असते,त्या वयात नव-याचं जग सोडुन जाणं, सासू सास-याचा आधार नसणं यात तिची किती कुचंबणा होत असेल..? शरीराच्या भावना इतरांबरोबर व्यक्त करायला आपला शहरातला समाजही घाबरतो तेथे ऊर्वी सारख्या ग्रामीण स्त्रीची काय कथा..? ऊर्वी अशीच राहील, समाज तिचा वापर करेल किंवा ती वाम मार्गाला लागेल यातील एक गोष्ट न घडल्यास नवलं….

                        पेन्सिल चौकात बस थांबली व मी उतरलो तरीही ऊर्वीचा विचार अजून डोक्यात घोळतं होता….


उदय कोठारी.

                                                                                                      

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे,

उमलती जशा धुंद भावना,अल्लड वाटे कसे,

बंध जुळती हे प्रितीचे,

गोड नाते हे जन्मांतरीचे.

ऑफिसमध्ये खुर्चीवर रेलून काचेतून बाहेर पडणारा पाऊस पाहताना नकळतपणे ओठी गाणं आलं. उन्हाळ्यातला कोरडेपणा सोसलेल्या धरणीला पाऊसाच्या थेंबाची लागलेली आसं ही पावसाच्या पहिल्या थेंबाबरोबर नाहीशी होते आणि सुरु होतो पावसाचा तो लयबद्ध नृत्याविष्कार… सरीवर पडणा-या सरी, मातीचा तो सुटलेला हवाहवासा सुगंध. वा-याने पानांची होणारी सळसळं. पाण्याचे वाहणारे पाट. सगळं कसं क्षणातं बदलतं. मुळात पाऊसं हा ॠतुचं भुतकाळी असावा.मनात आनंद फुलवणारा,चैतन्य निर्माण करणारा, आणि हळूचं भूतकाळात शिरून जुन्या जखमांवरची खपली काढणारा,सगळंच कसं जमत बुवा या पावसाला..

ऑफिस बाहेर पडणारी ती रिमझिम पाहून भूतकाळातली पाने फडफड करीत उडु लागली.बालपणी केलेला दंगा,मुद्दामहून आजारी पडून शाळेला मारलेली दांडी, पावसाळ्यात गळणारे ते मराठी शाळेतले छप्परं. सारे काही डोळ्यापुढे नाचू लागले.जगताप बाई वर्गातून गेल्यावर वर्ग बंद करुन केलेल्या त्या अंधारातल्या मारामा-या, पावसातं खेळलेल्या सूरफाट्या, पावसात भिजलो म्हणून खाल्लेला तो वडिलांचा मारं,आई स्वयंपाक करताना चुलीपुढे शेकलेले ते हात. धो-धो पावसाने होणा-या त्या काळोख्या अंधारास घाबरून आईला मारलेली मिठी. सगळं कसं लख्खं आठवतयं अजून..

पुढे हायस्कूलला गेल्यावर त्या आठवणी निघतं त्यालाही पावसाचीचं सादं… सहावीचा तो वर्ग इतर वर्गापासून लांब होता. त्याची नवीन कौलारे उचकटून टाकणा-या गव्हाणेला कोणं विसरेलं..? वर्गातली ती उर्जाराणीची कथा वाचताना त्या उर्जाराणीच्या तेजस्वी चेह-याकडे पाहून लागलेली ती प्रेमाची पहिली चाहूलं ती विसरावी कशी.? पोरकट प्रेम म्हणावं की प्रेमाचा पहिला अध्यायं….


प्रेम आणि पावसाचं अस काही कनेक्शन आहे की जल बिन मछली, नृत्य बिन बिजली. दोघेही एकमेकांशिवाय पुर्ण नाही.प्रेमाला येणा-या बहराला पावसामूळेच खरी शोभा आहे. वेळेनुसार प्रेमाची व्याख्या बदलते पणं बदलत नाही तो पाऊसं.ख्ररंच पावसाळ्यातल्या आठवणी कश्या घट्ट असतात.त्याचे रेशीम बंध कधीही तुटतं नाहीत. त्या रेशीम बंधात अश्या काही गोड,आंबट,काही भावनिक आठवणी असतात की त्यांचा जेवढा गुंतढा होईल तेवढ्याच त्या तेवढ्याच ब-या वाटतात. मग त्यात कॉलेजच्या पहिल्या प्रेमाचा सुगंध असतो वा मित्राच्या टोळक्यात केलेल्या भटकंत्या असतात.

Powered by Blogger.